Sunday 10 March 2019

रजोनिवृत्तीकाळातील जीवनशैली

 


                                                               रजोनिवृत्तीकाळातील जीवनशैली

                                                                                                                                                                                                                                    डॉ.नंदिनीआनंदमोरे
असो .प्रोफेसर,रसशास्त्रविभाग ,
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ ,कॉलेज ऑफ आयुर्वेद , पुणे .
मोबाईल नंबर :९४२२००४७३२
________________________________________________________________________
रजोनिवृत्ती हि स्त्रींजीवनातील महत्वाची शारीरिक वमानसिक अवस्थाबदलणारी नैसर्गिकप्रक्रिया आहे.रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रींची दरमासाला येणारी मासिकपाळी कायम बंद होणे हि अवस्था नैसर्गिक आहे .या अवस्थांतून प्रत्यके स्त्रींला जावे लागते .त्याकाळामध्ये निर्माण होणारी लक्षण माहीत नसल्यामुळे ती घाबरूनजाते .  
साधारणपणे मासिकपाळी हि वयाच्या चाळीस ते पंचावन्न वयापर्यंत बंद होते .आयुर्वेदाच्या दृष्टीकोणातून शरीरातील शुक्रधातू व्यक्त झाला कि यौवन प्राप्त होते मग मासिक पाळी सुरु होते.जन्मापासून शरीरातील रसधातू पासून शुक्रधातू पर्यंत सर्वधातूची वाढ झाल्यानंतर साधारणपणे सोळाव्यावर्षी शुक्रधातूची अभिव्यक्ती होते त्यानंतर त्या धातूंचा विकास हा पन्नास वर्षापर्यंत होत राहतो . म्हणून या काळात स्वाभाविक कालावधी चा अंतराने नियमित पाळी येते व पुढे पन्नाशीनंतर ह्ळुहूळु पाळी लांबत जाते . साधारणपणे मासिकपाळी जर सहामहिण्यापर्यंत आली नाही तर रजोनिवृत्ति झाली असे समजलें जाते . हया काळामध्ये बीज धारणाकरणाऱ्या पेशी इस्ट्रोजेन नावाचा ग्रंथी निर्माण करतात .परंतु चाळीशीनंतर इस्ट्रोजेन चे प्रमाण कमीकमी होतं जावून रजोनिवृत्तीचा काळात पूर्णपणे बंदहोतेआयुर्वेदानुसार पन्नाशी नंतर वातकाळ सुरु झाल्यामुळे शुक्रधातू स्वाभाविकपणे हळूहळू अव्यक्त होते व परिणामतःमासिकपाळीबंदहोते.
पाळी बंद होणे याचा अर्थ बीज कोषांची कार्यक्षमता संपते. जोपर्यंत बीजकोष कार्यक्षम असतो तो पर्यंत गर्भाशयातून रजप्रवृत्ती नियमित होते व गर्भधारणा होऊ शकते. साधारण चाळीस ते पन्नासवर्षापर्यंत शुक्रधातूक्षीण होतो त्यामुळे बीजकोष कार्यक्षम राहत नाही.परिणाम स्वरूप मासिक पाळी बंद होते.म्हणजेच या काळात स्त्रीची प्रजनन क्षमता संपते . या काळात स्वाभाविकपणे घडणाऱ्या शुक्रक्षीणतेमुळे अनेक विकार निर्माण होऊ शकतात , त्यामुळे हा काळस्त्रियांसाठी मानसिकदृष्या ठीक नसतोत्यामुळे अनेक व्याधीनिर्माण होऊ शकतात .उदा.संधीवात ,अस्थी ठिसूळ होणे,   कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे केस गळणे आमवात ,विकार होऊ शकतात.
अस्वास्थकरलक्षणे:
रसधातू क्षीण लक्षणेअनियमितपाळी ,त्वचारुक्षहोणे,  निस्तेजकोरडीपडणेछातीत धडधडणे,थकवा येणे.
रक्त धातूक्षीण लक्षणेअग्निमांद्यत्वचावैवर्ण्य ,
 )मांसधातू क्षीण लक्षणेवजनकमीहोणे,
मेद धातूक्षीण लक्षणे:शरीर बळ कमी होणेइंद्रियदौर्बल्य ,संधीवेदनासांध्यांमध्ये टोचल्याप्रमाणे वेदना ,
अस्थीधातू क्षीण लक्षणे :हाडे ठिसूळ होणेसांधे खिळखिळे होणेकेस गळणे .
मज्जाधातू क्षीण लक्षणे मलावरोध ,मलाचा खडा होणेडोळे ओढवणे , अंधेरी येणे , झोप न लागणे.
शुक्रधातूक्षीण लक्षणेवारंवार तोंड सुकणेअंग दुखणे .
 )ओजक्षीण लक्षणे:स्मरण शक्ती कमी होणेकांती व डोळे निस्तेज दिसणेआत्मविश्वास कमी होणेभीती वाटणे , मनात वाईट विचार येणे,  अकारण रडू येणे
मानसिकलक्षणे प्रसन्न न वाटणे ,नैराश्य , आकलन शक्ती कमी होणे .
रजोनिवृत्ती काळामध्ये पाळी अनियमित येते त्यामुळेशरीराला २५ – ३० वर्षे दर महिन्या ला दोष बाहेर टाकण्याची सवय असते ती बंद होते . त्यामुळे शरीरात दोष साचून राहतात व अस्वस्थपणा वाढतो .जेंव्हा शरीराला दोष पचन करण्याची सवय झाली कि हळूहळू लक्षणे कमी होतात.साधारणपणे एक ते दोन वर्षे हा त्रास कमी अधिक प्रमाणात होत राहतो .काही वेळा हृदयविकार,रक्तदाब , मधुमेह ,कॅन्सर ह्यासारख्या संचयात्मक रोगांची शक्यता निर्माण होऊ शकते . कारण शरीरातील दोषाचे शोधन होण्याचे बंद होते .तसेच ज्या स्त्रियांची स्वाभाविक रजोनिवृत्तीकाळाच्या आधी च काही कारणास्तव गर्भाशय काढावा लागतो त्यानाविशेषकाळजी ध्यावी लागते . 
रजोनिवृत्ती काळातील आहारविहार     
सकाळ चा नाश्ता    -  भाताची खीर , तांदळाचीखीरशिंगाड्याच्यापिठाचीखीर,गायचेदूध .तसेच तूप भातमुगाच्या डाळीची खिचडी  , पोळी भाजी सेवन केल्यामुळे मनाची तृप्ती व शरीराचे पोषण होते .ज्या स्त्रीयांना मधुमेह आहे किंवा स्थूल आहे तत्यानी खिरीत साखर घालू नये .
नारळाचे पाणी आठवड्यातून २-३ वेळा प्यावे .मनुकाचे सूप (काढा ) नियमितपणे रात्री जेवनापूवी घ्यावे .आहारातगहू , बाजरीजोंधळा , आंबेमोहोर , तांदूळ  , ह्यांचा समावेश करावा .डाळीमध्ये मुगाचीडाळ ,उडदाची डाळयांचा समावेश करावा .बदामभोपळाकाकडीखरबूजयांचा बियासेवन कराव्यात .अंजीरडाळिंब,पेरू या सारखी बहूबीजफळेसेवनकरावीत .आवळारसकिंवाएकआवळाउकडूननियमितसेवनकरावा .दुपारी - खारीक ,खोबरेखजूर ,चारोळ्या , जर्दाळू ,सुकामेवायांचासमावेशकरावा.          फळ - डाळींब ,आवळाबोरे , द्राक्ष सेवन करावीत .   भाज्या - कोहळा ,भोपळा , काकडी,  घोसाळे , दोडकी,पडवळ ,यांचेभाज्या किंवा सूप यांचा समावेश करावाहिरवी मिरची हि पित्ताचा क्षोभनिर्माण करणारी ,शुक्रक्षीणकरणारी ,वातवर्धकत्याऐवजी आलेसुंठ वापरावे . आणि जिरे ,धनेकोथम्बीर लसूण ,कांदाया मसाल्याचा उपयोग विशेषतः करावा .                   
अशा प्रकारे योग्य ती काळजी व आहार यांचे पालन केले तर रजोनिवृत्तीचा काळ हा सुखकर होऊ शकतोत्यासाठी कुटूंबाचा पाठिंबा व खालील गोष्टीचा प्रामुख्याने होऊ शकतो .
या काळामध्ये स्त्रियांची शारीरिक व मानसिक काळजी घेणे आवश्यक असते.या प्रक्रियांमध्ये कुटुंबामधील पती ,मुले , सासूयांचा महत्वाचा भाग आहे .स्त्रियांचा हार्मोनल असमतोल असल्यामुळे तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये बदल होतो त्यामुळे तिच्याशी वर्तणूक करताना तिच्या मनाची काळजी घेणेआवश्यक आहे .
सक्रिय जीवनशैली ,व्यायाम आणि छंद – स्त्रियांनी आनंदाने प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होणे तिच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे . वाचन ,समाजकार्य , संगीत , कुटुंबाशी व मित्राशी संभाषण या गोष्टी मनापासून कराव्यात .
व्यायाम सकाळी १५-२०मिनिटचालणे ,खेळ , वेगवेगळे छंद जोपासावेत .
प्राणायाम –मानसिक स्वास्थ चांगलेराहते ,ताण कमी होतो , मूड चांगला राहतो  .
तैलमसाज –हाडे ठिसूळ होणे ,कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते ते वाढवण्यासाठी रोज तैलाने मसाज करावा . महानारायणतैल ,क्षीरबलातैलं रोज किंवा आठवड्यातून१-२वेळा लावावे .
आहार – कॅल्शिअमयुक्त आहार जास्त प्रमाणात , हिरव्या पालेभाज्या , लोहाचे प्रमाण जास्त ,घृत , फळे यांचा समावेश असावा .
अपथ्यकर आहार - तैलकट ,जास्त मीठ व साखर युक्त आहार वर्ज्य करावा .
रजोनिवृत्तितील लक्षणासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती :
लाक्षणिक चिकित्सेबरोबर दोषांना समस्थितीत आणणारी चिकित्सा करावी .   साधारण पणे ४० ते ५० वर्षाच्या महिलांमध्ये पित्त आणि वातदोष वाढलेले असतात . म्हणून त्याना समस्थितीत आणावेत .रजोनिवृत्तिसाठी काही औषधी कल्प :   औषधे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावीत.  स्वतःच्या मनाने घेऊ नये .
पुष्यानुगचूर्ण : याचा उपयोग अत्यार्तव ,  श्वेतस्त्राव , पाळीच्या विकृती , विविध कारणमुळे होणारा अत्यार्तव
अशोकारिष्ट : कष्टार्तव , अत्यार्तव , ज्वर , रक्तप्रदर
पत्रांगासव :अत्यार्तव , श्वेतस्त्राव , ज्वर
ताण ,नैराश्य , निद्रानाश साठी काही औषधे  : 
)  अश्वगंधाअरिष्ट  :याचा उपयोग अश्रद्धा , ताण आरति यामध्ये बल व व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी याचा उपयोग करतात .
जिरकारीष्ट :पचनविकृती ,  ग्रहणी दौर्बल्य
बलारिष्ट :मज्जावह संस्थेच्या विकृती ,  वातविकृती   , मांसपीडा व संधीशूल व दौर्बल्य
 )चंद्रप्रभावटी:   मूत्रवहसंसर्ग , मूत्रकष्टता . मूत्रअश्मरी .मलावस्तंभ ,उद्गार , उदरशूल,  कटीशूल,  योनिशुष्कता ,बहुमूत्रता , मूत्रकृच्छता
)  गोक्षुरादिगुग्गुळ : प्रमेह , मूत्रकष्टत* , स्त्रियांच्या रोगामध्ये विशेषतः अत्यार्तव .
6)  कामदुधारस , प्रवाळपिष्टी  ; पित्तशामक व कॅल्शियमपोषकसर्वांगदाह
7) तृणपंचमुळं क्वाथ :मूत्रवह संस्थानच्या विकृती  , मूत्रदाह
रक्ताल्पतेसाठी रक्तपोषक औषधी द्यावीत . लोहासव  , अमलकीरसायनधात्रीलोह,सप्तामृतालोह,  सारिवाद्यावलेह   .
रसायनचिकित्सा :
स्त्रियामध्ये रसायनकर्मासाठी कोणतीही औषधे वैद्याच्या सल्ल्यानुसार वापरू शकतात . त्यामुळे थकवा निराशा ,रक्ताल्पता इ . लक्षणांमध्ये उपयोग होतो .
1शतावरी रसायन  स्त्रीविशिष्ट रोगामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात . मूत्रमार्गाचे व्याधी ,यकृतरोगामध्ये .
2सुकुमारीघृत :स्त्रियांमध्ये पोटदुखी.  विद्रधी ,मूळव्याध,कष्टार्तव , गर्भाशयसूज , मलावस्तंभ
घरगुती उपाय :मेथीचे लाडू , हळीव लाडू .गरम दुधाबरोबर घ्यावेत .
रजोनिवृत्ती हि एक नैसर्गिक प्रक्रिया असते व त्यामधून प्रत्येक स्त्रीला जावे लागते . जेव्हा पाळी दर महिन्याला यायची कायमची थांबते . असे सलग १२ महिने झाले म्हणजे रजनिवृत्ती झाली असे समजावे
रजोनिवृत्ती हा आयुष्यातील पूर्ण विराम नसतो , किंबहुना आयुष्यातील नवीन सुरुवात करण्याची एक नवी संधी असते .